प्रिय तात्या
इकडून पाठवलेला फराळ मिळाला असेलच.
हल्ली सगळे शुभेच्छाच पाठवतात फराळ कुणीच पाठवत नाही.उठसुठ फटाके वाजवूं नका सारखे मेसेज पाठवत बसतात.तिकडे न्युयॉर्कला वाजतात का फटाके?आता ३१ डिसेंबरला फटाके उडतात म्हणे तिकडे.किती भारी दिसत असतील ना ते?
आकाशात उंच जात,मग त्यांची रोषणाई डोळ्यांचं अक्षरश: पारणं फेडत असेल.गगनचुंबी इमारती असल्या कि असले फुकटचे सल्ले कुणी देत नसेल बहुतेक.
नाईकांच्या राजाने सिडनीचे फोटो टाकले होते म्हणे फेसबुकला,पाहिलेस का?
ऑलिंपिकमध्ये सुद्धा वाजतातच कि फटाके,ते सुद्धा आनंददायी.मनमोहक वैगेरे असतात.
डिस्ने लॅन्डमध्ये स्पेशल लाईट शो असतो म्हणे?मी पण म्हणतोय यंदा जाऊन यावं हॉंगकाँगला.पण मला रजा मिळत नाहीये.
आणि मजा माहितीय का तुला?
या विलायती फटक्यांनी आजिबात प्रदुषण होत नाही म्हणे.म्हणून पुढच्यावेळी इकडून फराळ पाठवला कि तिकडून फटाके पाठव.
कसे?
ता.क.
तिकडे ट्रम्प येईल की हिलरी? कुणीही येवो निवडणुका जिंकल्यावर ते फटाके फोडतात का कळव.
तुझाच
स.दा.भोळे
Monday, 31 October 2016
आमचे पत्र
Friday, 21 October 2016
संग्राम
Tuesday, 18 October 2016
विचार न करितां कारण....
भारताची सर्जिकल स्ट्राईक जितक्या बेमालूमपणे झाली तितक्याच किंवा त्यापेक्षा जास्त तीव्रतेने त्यावर देशात टिप्पणी केली गेली.मग आत्यंतिक राष्ट्रवादाने पेटून पाकिस्तानला संपवण्याची केलेली भाषा असो किंवा मोदीद्वेष्ट्यांनी या स्ट्राईकचे पुरावे मागण्याइतपत केलेला शहाणपणा(?) असो.दोन्हीही अतिरेकी आणि तितकेच विचारहीन.परवा या वादात अजून एक भर पडली.देशाचे रक्षामंत्री मनोहर पर्रीकर यांनी "....कदाचित संघाची शिकवण कामी आली असेल." अशा अर्थाचं एक विधान केलं.(मूळ विधान खाली बघा) आणि सगळीकडे हलकल्लोळ उठला.तो उठणही स्वाभाविकच होतं म्हणा.
या विधानावरून कुठूनही या हल्ल्याची प्रेरणा संघ,तिथले बौद्धिके,पद्य यात दडली आहे असं म्हटलं नाही.भाषेचा अर्थ उत्तम लावणारा कुणीही 'कदाचित(maybe)' चा सुयोग्य अर्थ लावतो.(मुद्दलात तो काढायला वेळ कुणाला आहे?असो)
त्यांच्या सांगण्याचं तात्पर्य हे आमची निर्णयकौशल्यता,अचूकता,आक्रमकता हे सारं संघशिक्षेतुन आलं असा होता.वास्तविक इथे पर्रीकर आणि संघाला घेरणे सोपे होते."एक 'सांस्कृतिक संघटना' तुम्हांला surgical strike ची प्रेरणा देते म्हणजे तुम्ही युद्धखोर आहात,फॅसिस्ट आहात"वैगेरे सरावाचे आरोप संघावर करता येणं शक्य होतं.खरंतर यावर त्यांची उत्तम कोंडी झाली असती.राहुल गांधी यांना देखील बोलायला अजून एक मुद्दा मिळाला असता,चॅनेल्सला टीआरपी मिळाला असता,पेपरला रकानेच्या रकाने भरून लिहिता आलं असतं.पण हा सगळा फायदा या त्रयी गमावला तो चुकीचा अर्थ काढून.(त्यामुळे चुकीचा अर्थ काढताना तो निदान स्वतःसाठी तरी बरोबर असेल याची काळजी घ्यायला हवी.)
आरोपांच्या बेछूट,तर्कहीन आणि अविचारी फैरी चालवायचा म्हटलं की विरोध 'कुठं' करायचा ते हि कळलं पाहिजे....!मोदींच्या आणि संघाच्या द्वेषापायी मोदीद्वेष्ट्यांचा हा विवेकच गहाळ झालाय का असा प्रश्न पडतो तो यामुळेच.©
टीप-
१)
" The Prime Minister hails from Mahatma Gandhi's home state and
defence minister comes from Goa which never had a 'martial race'.
And then take this surgical strike. This was a different kind of
combination. May be the RSS teaching was at the core," said
Parrikar at an event in Ahmedabad's Nirma University.
http://toi.in/B-G3Pb/a19li