Friday, 30 October 2020

आलम लेखक आणि कवीवर्गाने चंद्रावर जितका अन्याय केला आहे तितका आजपर्यंत चंद्रावर गेलेल्या अंतरळवीरांनीदेखील नाही केला.चंद्र हा स्त्री की पुरुष यावरच खरा संभ्रम आहे. म्हणजे बघा,
'ये चांद सा रोशन चेहरा'( एस. एच. बिहारी) किंवा 'चौदहवी का चांद हो'(शकील बदयुनी) सारख्या गाण्यांत चंद्राची तुलना प्रेयसीच्या चेहऱ्याशी कवी करतो. तर 'चांद मेरा दिल (मजरूह सुलतानपुरी),गली में आज चांद निकला' (आनंद बक्षी)यात चंद्राला पुरुषपणा चिकटवला. त्यामुळे चंद्र हा नवरंगच्या 'अरे जा रे हटे नटखट...' मधला वेष घेऊन अवकाशात वावरत असावा असं मला अनेकदा वाटतं.
गदिमांसारख्या सारस्वताने 'सावळा गं रामचंद्र,रत्नमंचकी झोपतो,त्याला पाहता लाजून,चंद्र आभाळी लोपतो' मध्ये चंद्राची तुलना श्रीरामाच्या मुखकमलाशी केली,माउलींनी पसायदानात डाग नसलेला, अलांच्छन चंद्रमा मागितला. तर '...शाळा चांदोबा गुरुजींची' सारख्या बालगीताने चंद्राला मास्तर केले.याउपर 'चांदोबा चांदोबा भागलास का? ' किंवा
'निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला गं बाई..'ने त्याच्याशी मामाचं नातं जोडलं.

सगळ्यात जास्त moods चं variation उर्दू शायर लोकांनी दाखवलं !इब्न-ए-इंशाचं,
'कल चौदहवी की रात थी,
शब भर रहा चर्चा तेरा,
कुछ ने कहां ये चांद हैं,
कुछ ने कहां चेहरा तेरा । 'मधला romance असो किंवा
परवीन शाकिरचं,
'इतने घने बादल के पीछे
कितना तन्हा होगा चाँद '
मधलं काळजाला भिडणारे एकाकीपण असो,वा

'चाँद का हुस्न भी ज़मीन से है ,चाँद पर चाँदनी नहीं होती |'  इब्न-ए-सफीच्या या शेर मध्ये व्यक्त होणारं pride असो.

चंद्र सगळीकडे आहे.बाल्य, तारुण्य आणि वृद्धत्व या तीन कोपऱ्यात चार पुरूषार्थ व्यापून उरणारा चंद्र मोठा की celestial entity असलेल्या एका निर्जव उपग्रहाला सजीवत्व देणारे साहित्यिक मोठे ? हा न सुटणारा प्रश्न आहे तो तसाच न सोडवता राहू दिलेला बरा.

Saturday, 10 October 2020

१९४२ चालू होतं,देशात क्रांतीचं वातावरण पेटलेलं होतं. हरिवंशराय तेव्हा अलाहाबादला राहायचे,मागच्याच वर्षी १९४१ ला लग्न झालं होतं त्यांचं तेजी बरोबर.११ ऑक्टोबरला त्यांना मुलगा झाला.हरिवंशराय यांचा मित्रपरिवार मोठा,सगळे घरी येऊन बाळाला बघून जात होते.त्यावेळी सुमित्रानंदन पंत हरिवंशराय यांचे शेजारी राहत. सुमित्रानंदन म्हणजे हिंदी काव्यातील बडी असामी.त्यांनी बाळाला पाहिलं,ते मोठ्या शांतपणे झोपलेलं होतं डोळे मिटून. पंत म्हणाले "किती शांतपणे झोपलाय हा,जणु ध्यानस्थ अमिताभच." तेजी बच्चन यांना आवडलं ते नावं, त्या म्हणाल्या मुलाचं नाव अमिताभ ठेऊयात.
"क्रांतीने भारलेल्या वातावरणात जन्माला आलाय,मी म्हणत होतो मुलाचं नाव इन्कलाब ठेवावं." हरिवंशरायांनी आपली इच्छा सांगितली."अमिताभ हे बुद्धाचं नाव आणि बुद्धापेक्षा मोठा इन्कलाब कोण आहे? सुमित्रानंदन म्हणाले.
"जर इन्कलाब त्याच्या मनात असेल तर आणेलच की तो इन्कलाब." पंतांनी पुस्ती जोडली आणि तिघेही हास्यात रमले.
त्या लहान बाळाला त्याचं नाव मिळालं,ते बाळ होतं अमिताभ 'बच्चन'

- निखील©

Thursday, 7 May 2020

टागोर

रवीन्द्रांचे माझ्या संग्रहातील हाताला लागेल ते पुस्तक घेऊन मी फुरसदीच्या क्षणी वाचत असतो. ते क्षण सत्कारणी लागले नाहीत असे मला केव्हाही वाटत नाही. त्यांच्या साहित्यामुळे शांतिनिकेतनपासून असलेले दूरत्व भासत नाही की तिथे जाण्याची ओढ अधिक लागते हे मला सांगता येत नाही. शांतिनिकेतनात गेलो त्यावेळी गुरुदेवांच्याच शब्दांत सांगायचे म्हणजे 'जीबोने आज कि प्रथम एलो बशन्तो?  (जीवनातच आज प्रथमच वसन्त आला का ?) असा प्रश्न मल पडला होता. पुढे साऱ्या ऋतंतले सौन्दर्य पाहाण्याची त्यांनीच दृष्टी दिली. वसंताचे स्वागत करणारे रवीन्द्र ग्रीष्माला देखील 'अग्निस्नाने शुचि होक धरा-' अग्निस्नानाने पृथ्वी शुचिर्भूत होवो म्हणताना दिसले. आज एखाद्या पहाटे मराठी नाटकातले एखादे जुने पद माझ्याबरोबरच माझ्या मनात जागे होते, तितक्याच सहजतेने बंगाली बाऊलांच्या गीतांतले गीतही माझ्या बरोबर उठते. आकाशातले ढग नकळत 'बादोल बाऊल बाजाय रे एकतारी-' (मेघ बाऊल एकतारी वाजवतोय) ही ओळ सुचवून जातात. पावसाळ्यात पानांवरून पाण्याचे थेंब टपटप गळू लागले की ते रवीन्द्रांच्या कवितेतल्या _'पाताय पाताय टुपुर टुपुर नुपूर मधुर बाजे'_ चे स्मरण करून देतात. एका फार मोठ्या भांडाराच्या किल्ल्या मला गवसल्या ह्याचे मला समाधान आहे.
                                           -पु.ल.देशपांडे
                         ('वंगचित्रे'च्या प्रस्तावनेमधून साभार)

Monday, 13 January 2020

छपाक आणि चपराक

          ओरमॅक्स सिनेमॅटिक्स नावाची एक कंपनी,सिनेमाच्या first Day opening बद्दल अंदाज लावणे हे तिचे काम.या कंपनीचे अंदाज सिनेमाजगत गांभीर्याने घेतं,सिनेमाचा Buzz,Reach, appeal आणि intrest या चार निकषांवर हे ratings ठरतात,त्यावर सण,परीक्षा,क्रिकेटमॅचेस आणि वातावरण या घटकांचा होणारा परिणाम अभ्यासला जातो आणि रोजच्या रोज त्यानुसार Promotinal strategy ठरवली जाते.ओरमॅक्सने गेल्या आठवड्यात आपली रेटिंग जाहीर केली तेव्हा छपाक तिसऱ्या स्थानी होता,पहिल्या स्थानी तानाजी,दुसऱ्या स्ट्रीट डान्सर.हे बघून दीपकासाठी काम करणाऱ्या PR ने रणनीती आखली आणि  Controversy निर्माण करत सिनेमाला फायदा मिळावा यासाठी तीने JNU मध्ये जायचं ठरलं.

          थोड्याच वेळात Twitterवर छपाक Trending होता,त्याने सिनेमाची चर्चा वाढली खरी मात्र सिनेमाला अपेक्षित यश मिळाले नाही.आठवडा भरात त्याने केवळ १९.०१ कोटींचा व्यवसाय केला याउलट तानाजीने ६१.७४ कोटींची कमाई केली.'जजमेंटल हैं क्या..'  सिनेमापेक्षाही दीपिकाच्या सिनेमाला कमी openings मिळाले.आता तिच्या जाहिरातींच्या प्रक्षेपणात देखील घट आली आहे. व्यवसाय म्हणून एखाद्या हुल्लडबाजी करणाऱ्या जमावात जाऊन स्टंटबाजी करणाऱ्या कलाकारांना,दीपिकाने आवाज उठवला अशा बाळबोध कल्पना असणाऱ्यांना ही देशातील जनतेने लगावलेली 'चपराक' आहे....!