स्वतःची दुकानदारी टिकवण्यासाठी राजसत्तेस
लोंबकळणारे धर्मगुरू हे अन्य मर्त्य मानवांइतकेच
सामान्य असतात. मग ते बाबा रामदेव असोत, श्री श्री
रविशंकर असोत की मदर तेरेसा असोत. असल्या
बनावांना संत ठरवण्याची परंपरा सर्व धर्मात असते.
मदर तेरेसा हे याचे ताजे उदाहरण. त्यांच्या कथित
संतपणावर ख्रिस्ती धर्म पीठाने सोमवारी शिक्कामोर्तब
केले. यातून अधोरेखित झाली ती व्यवस्थेची
परस्परपूरकता. म्हणजे व्यवस्थेने स्वतःला अनुकूल
असलेल्यांना संत म्हणायचे आणि या नवसंतांनी
आपल्या कथित समाजसेवा द्वारे ही आंधळी
धर्मव्यवस्था बळकटराहील याची काळजी घ्यायची.
असली बनवेगिरी आणि बनाव यांत ख्रिस्ती धर्मात
जेवढे चातुर्य दाखवले ते समजून घेण्यासाठी
अन्यांना २१ व्या शतकाची वाट पाहावी लागली.
ख्रिस्ती धर्माची ही उद्यमशीलता समजावून घ्यायची
असेल तर त्या धर्माच्या प्रसाराचा इतिहास पाहावा
लागेल, ख्रिस्ती धर्माचा प्रसार झाला तो त्या धर्मातील
धर्मगुरूंच्या कथित शक्तीमुळे नव्हे. तर या धर्माचा
प्रमुख हाच एके काळी राजसत्तेचा प्रमुख होता
म्हणून. एके काळी रोमन साम्राज्याची सूत्रे धर्मगुरू
पोप यांच्याकडेच होती. म्हणजे धर्मसत्ता आणि
राजसत्ता एकत्रच नांदत. अशी उदाहरणे अन्य
धर्मात आहेत. अलीकडे इस्लाम धर्मातील वहाबी
या कट्टरपंथीयांच्या प्रसाराविषयी बरेच बोलले जाते.
आयसिस हा या वहाबी धर्म विचारांचे प्रतीक. हा
वहाबी पंथ पसरला त्याचे कारण या पंथाचा
संस्थापक मुहम्मद इब्न अब्द अल वहाब याने एका
नव्या, संभाव्य देशाचा संस्थापक महंमद बिन इब्न
सौद याच्याशी हातमिळवणी केल्यामुळे.
राजकारणात स्थिरावू पाहणाऱ्या सौद यास आपली
पापकृत्ये आणि हिंसा माफ करणारी कोणी धर्मसत्ता
हवी होती आणि स्वतःच्या धर्म विचारांचा प्रसार करू
पाहणाऱ्या महंमद वहाब यांस त्यासाठी राजकीय
आश्रय हवा होता. या परस्पर संयोगातून वहाबी पंथ
आणि सौदी अरेबिया यांचा उदय झाला. बौद्ध
धर्माच्या प्रसाराबाबतही असेच सांगता येईल. सम्राट
अशोक आदींच्या काळात हा धर्म पसरलायामागील
कारणही हेच. तेव्हा राजसत्ता आपल्यास उपकारक
ठरणाऱ्या धर्मगुरूंना संतपद देण्यास नेहमीच आतुर
असते.
यावरून मदर तेरेसा यांना संतपद का दिले जाते,
याचे कारण लक्षात वावे. ख्रिस्ती धर्माच्या पात्रता
निकषानुसार किमान दोन तरी चमत्कार संभाव्य
संतांच्या नावावर असावयास हवेत. परंतु हे कारणच
मुदलात बोगस आहे. चमत्कार वगैरे थोतांड हे
संतपदाच्या निर्णयाचे समर्थन करण्यासाठी आणि
दाखवण्यासाठी. प्रत्यक्षात खरा निकष म्हणजे
संभाव्य संताने घडवून आणलेली धर्मांतरे. मदर तेरेसा
या कार्यासाठी विख्यात होत्या. समाजसेवा हे त्यांचे
आवरण. या आवरणाखाली त्यांचा चेहरा होता तो
धर्मांतरासाठी हपापलेल्या व्यक्तीचा. हे कटू सत्य
इतिहासकार विजय प्रसाद ते क्रिस्टोफर हिचेन्स अशा
अनेकांनी सोदाहरण दाखवून दिले आहे. 'व्हाइट वुमन इन रेसिअलाईज्ड स्पेसेस' या ग्रंथात निबंधात प्रसाद यांनी मदर तेरेसा यांना भारत मोठेपणा का मिळाला हे सविस्तरपणे समजावू सांगितले आहे. हिचेन्स एक पाऊल पुढे जात मदर
तेरेसा यांचे वर्णन 'फॅनेटिक, फंडामेंटालिस्ट अँड फ्रॉड' असेच करतात. 'या बाईला संतपद दिले तर उलट गरीब
आणि आजाऱ्यांची संख्या वाढेल', असे हिचेन्स म्हणतात. 'मदर तेरेसा यांना संतपद देणे ही रोमन कॅथलिक चर्चने अंधश्रद्धा आणि दिखाऊपणापुढे पत्करलेली शरणागती आहे', असेच त्यांचे मत आहे आणि कोणीही बुद्धिवादी व्यक्ती त्यांच्याशी असहमत होणार
नाही. मदर तेरेसा यांना गरिबांच्या, जराजर्जर, जरत्कारू अशांच्या उदात्तीकरण रस होता.या अशा रंजल्यागांजलेल्यांची आपण सेवा करतो, असा
त्यांचा दावा होता. त्यासाठी त्यांनी अनेक वैद्यकीय
केंद्रे स्थापन केल्याचा दाखला दिला जातो. परंतु
वैद्यकीय केंद्रे अकार्यक्षम ठेवली गेली होती, ते
साधनसुविधांच्या जोडीला किमान स्वच्छतेचा अभाव असे, हे अनेक पाश्चात्त्य लेखकांनी दाखवून
दिले आहे. यामागील गंभीर बाब म्हणजे हे सर्व
जाणूनबुजून केले जात असे. वा वैद्यकीय केंद्रात
साधी वेदनाशामक देखील नसते. आर्थिक मदतीत
आणि पैशाच्या अखंड स्रोतात आकंठ डुंबणाऱ्या
मदर तेरेसा आणि त्यांच्या संस्थांनी त्यांच्याकडील वैद्यकीय व्यवस्था परिपूर्ण म्हणून त्यांना केल्या नाहीत कारण त्यांना वेदनेच्या प्रदर्शनाचे आकर्षण होते. अशा वेदनांमुळे वर्तन करीत स्वार्थ कळवळणाऱ्याच्या चेहऱ्यावरून आपण मायेचा हात कसा फिरवतो हे दाखवण्यात मदर तेरेसा आनंद मानत. 'या वेदना किती सुंदर आहेत. त्यातून जग बरेच काही शिकते',असे खुद्द मदर तेरेसाच हिचेन्स यांना दिलेल्या मुलाखतीत म्हणाल्या होत्या.
जवळपास १०० देशांत शाखा असणाऱ्या या मदर
ओळखल्या जातात त्या भारतीय म्हणून. याचे कारण
या देशातील गुलामी मानसिकता. कोणी तरी गोरी
व्यक्ती आपल्याविषयी सहानुभूती दाखवते याचे
अजूनही येथील शिकल्यासवरलेल्यांस अप्रूप. तेव्हा
बातांत काही अर्थ नाही. धर्म आणि राजसत्तेला पूख
असे वर्तन करीत स्वार्थ आणि परमार्थ साधल्याची ई
बक्षिसी आहे. या असल्या बेगडी संतमहंतांची ताक
जर खरी असती तर मदर तेरेसा ज्या संस्कृतीतून
येतात त्याच पाश्चात्त्य संस्कृतीने विज्ञान आणि
संशोधनात वेळ घालवला नसता.
यातून दिसते ते इतकेच की मानवी प्रज्ञा विज्ञान
तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात नवनव्या संशोधनाने गगनाला
गवसणी घालू पाहत असली तरी त्याच काळातील
धर्म संस्था मात्र मागास राहण्यातच धन्यता मानते
पृथ्वी सपाट नाही, गोल आहे असे पंधराव्या शतकात
सांगणाऱ्या गॅलिलिओ यांस छळणारे आणि मदर
तेरेसा यांच्या चमत्काराच्या कंड्या पिकवणारे ख्रिस्त
धर्मगुरू हे एकाच काळाचे प्रतिनिधित्व करतात.
असले मागास धर्मगुरू हीच काय ती सर्व धर्माचे
मानवजातीला देणगी. मग ते मुलगा व्हावा यासाठी
गर्भसंस्कारांचे थोतांड विकणारे बालाजी असो
किंवा स्वतःला रामाचा अवतार म्हणवून घेत
धाकट्या भावाला लक्ष्मण आणि दागिन्यांनी मढलेली
पत्नीस सीतामाई ठरवत बौद्धिकदृष्ट्या अजाग
भक्तांचे आर्थिक, लैंगिक शोषण करणारे कोण
बाबा बापू असोत. हे सर्वच एका माळेचे मणी
अलीकडच्या काळात असल्या संतांचा फार
सुळसुळाट वाढला असून हे समाजाच्या ढासळत्य
सामाजिक आरोग्याचे निदर्शक आहे. 'असंगाशी
संग, प्राणाशी गाठ', असा सल्ला खरे संत देतात
असंतांचे संत म्हटल्याचा परिणामही असाच असेल.
Monday, 26 August 2019
असंताचे संत
Subscribe to:
Comments (Atom)