Wednesday, 6 September 2017

शोधाच्या दिशा.....

      ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येचा त्रिवार निषेध.हत्या कुणाचीही असो ती दमणकारीच,मग डाव्या कॉम्रेडची असो की उजव्या स्वयंसेवकाची,त्याचा निर्भत्सनाच केली पाहिजे आणि कायद्याने त्यांना योग्य ती शिक्षा व्हायला हवी यात दुमत नाही.
        इतर कुठल्याही हत्येनंतर काही प्राथमिक प्रश्न उपस्थित होतात. हत्या कुणी केली?कशी केली? त्यामागे नेमका हेतू काय होता? हे त्यातील काही.गौरी लंकेश यांच्या हत्येनंतरही हेच प्रश्न पुन्हा डोकं वर काढत आहेत.फक्त इतरवेळी या प्रश्नांची उत्तरं पोलिस-न्यायपालिका शोधते इथे सोशल मीडियावर बसलेल्या 'तज्ञ न्यायमूर्तींना' आणि 'साक्षीदारांना' ती आधीच माहिती असतात.दाभोलकर, पानसरे,कलबुर्गी यांप्रमाणेच गौरीजींची हत्या उजव्या विचारसरणीने केली हा तपासाविना काढलेला निष्कर्ष त्यातलाच प्रकार.तपासाला अशी दिशा देणारी(?) विधानं करणं जवाबदार माध्यमांनी आणि व्यक्तींनी थांबवणं हितावह राहील ते याच कारणामुळे असं मानायला जागा आहे.
        दुसरा भाग येतो तपासाचा. दाभोलकर,कलबुर्गी आता लंकेश या तिघांच्याही हत्या काँग्रेसचं सरकार असताना झाल्या.ज्यांना राज्यशास्त्र थोडंबहुत कळतं त्यांना कायदा आणि सुव्यवस्था राज्याच्या अखत्यारीत येतं हे समजते.
          तिसरा आणि वरकरणी लहान वाटणारा पण Propaganda पसरवणारा मुद्दा. कुठल्यातरी टोकाच्या हिंदुत्ववाद्याने लंकेश यांच्याबद्दल अवमानकारक tweet केले.(मृत्यूनंतर एखाद्याविषयी अप्रिय बोलले जात नाही ही हिंदु संस्कृती त्याला कळलेली नसावी.)तर या व्यक्तीला PM follow करतात म्हणून आगडोंब उसळवला जातो. हे किती खरं-किती खोटं देव जाणे. परंतु ट्विटरवर follow केल्या जाणाऱ्या प्रत्येकाच्या विचाराशी आपण सहमत असूच असे नाही,निदान मुक्त विचारांची वकिली करणाऱ्यांनी तरी हे भान बाळगले पाहिजे.
           Francis Parker Yockey हा अमेरिकन राजकीय तत्वज्ञ एकदा म्हटला होता,
"Rationalism, which is the feeling that everything is subject to and completely explicable by Reason, consequently rejects everything not visible and calculable."
        याचं आपल्याला विस्मरण झाले आहे का?
©