Saturday, 5 November 2016

रम्याची गोष्ट

   आमचं रम्या,येगळंच माणूस बघा.म्हंजी इपितरपणा किती असावा एखाद्यामध्ये काय लिमिट नाही त्याला.तसं त्याच नावच रमेशकुमार...पण सगळे त्याला रम्या म्हणत.निस्त्या खोड्या काढ नी दंगा कर.
       एकदा काय झालं,शाळेत हुतो आमी सारे.तर याने तिथं गप बसावं कि नाई?
नाईच ओ,तिथंपण दंगा सुरु...
मास्तर आम्हांला सांगायचं प्रश्न विचारणं चांगलं असतंय,माणूस हुशार हुतोय म्हणून.आमी कधी इचारले नाय बा.पण ही रम्या काहीबी इचारायचं.
मास्तरला विचारतंय,
"सिनेमा कधी येणार म्हणून?
गावात कुस्ती कोण जिंकणार?
औंदा सरपंच कोण होणार?
खिचडी कधी मिळणार खायला?"
      मग गणिताच्या तासाला असले प्रश्न विचारले की काय होणार....मार खायचं ते नुसतं.
       एकदा यान काय केलं माहितीय का?
मास्तर गेलं हुतं बाहेर...
हे रम्या, चावट घुसलं कि त्याच्या खोलीत..
आणि त्याची पुस्तकं, रंगीत खडू,खेळाचं सामान सगळं उचकलं....पोरांनी रंगीत खडू खेळायला घेतले पण.

मास्तर बाहेरून आलं तेव्हा त्याला कळलं हे सगळं.
मास्तर म्हणाले "रमेश कुमार,तु असं का वागलास?
शिक्षकांच्या खोलीत का शिरलास?"
रम्या गार....बोलणार काय,चुकलंच हुतं.
मास्तर म्हणाले आता थांब,कारवाईच करतु,
आणि त्यांनी एक दिवसासाठी रम्याला शाळेतून suspend केलं...हाकलून दिलं ओ डायरेक एक दिवसासाठी.

जवा हे घरी कळलं तवा रम्याच्या पैलवान बापानं खेटराने पुजा बांधली होती त्याची....

त्यानंतर कधी असला आगाऊपणा केला नाई रम्याने,आपली चूक असताना बी शायनिंग मारायचा प्रकार कि नाई नव्हता त्या टायमाला.

आज हे सगळं अचानक आठवलं...
का विचारा कि राव.....प्रश्न पडले पाहिजेत,
  'पण प्रत्येक प्रश्न आत्ताच पडायला सुरुवात का झाली?' असा प्रश्न नको पडायला.
काय म्हणता?