Saturday, 10 October 2020

१९४२ चालू होतं,देशात क्रांतीचं वातावरण पेटलेलं होतं. हरिवंशराय तेव्हा अलाहाबादला राहायचे,मागच्याच वर्षी १९४१ ला लग्न झालं होतं त्यांचं तेजी बरोबर.११ ऑक्टोबरला त्यांना मुलगा झाला.हरिवंशराय यांचा मित्रपरिवार मोठा,सगळे घरी येऊन बाळाला बघून जात होते.त्यावेळी सुमित्रानंदन पंत हरिवंशराय यांचे शेजारी राहत. सुमित्रानंदन म्हणजे हिंदी काव्यातील बडी असामी.त्यांनी बाळाला पाहिलं,ते मोठ्या शांतपणे झोपलेलं होतं डोळे मिटून. पंत म्हणाले "किती शांतपणे झोपलाय हा,जणु ध्यानस्थ अमिताभच." तेजी बच्चन यांना आवडलं ते नावं, त्या म्हणाल्या मुलाचं नाव अमिताभ ठेऊयात.
"क्रांतीने भारलेल्या वातावरणात जन्माला आलाय,मी म्हणत होतो मुलाचं नाव इन्कलाब ठेवावं." हरिवंशरायांनी आपली इच्छा सांगितली."अमिताभ हे बुद्धाचं नाव आणि बुद्धापेक्षा मोठा इन्कलाब कोण आहे? सुमित्रानंदन म्हणाले.
"जर इन्कलाब त्याच्या मनात असेल तर आणेलच की तो इन्कलाब." पंतांनी पुस्ती जोडली आणि तिघेही हास्यात रमले.
त्या लहान बाळाला त्याचं नाव मिळालं,ते बाळ होतं अमिताभ 'बच्चन'

- निखील©

No comments:

Post a Comment