रामेश्वरम जवळच्च्या त्या समुद्रात
आपली छोटी नाव वल्हवताना तो लडका बघत होता एक ख्वाब.....
आसमान कवेत घेण्याचं
पंछीसारखं उंच उडायचं…
हाताचे पंख करून किनाऱ्यावरून सैरावैरा धावताना,
तेच ख्वाब तरळायचं हमेशा त्याच्या नजरेत....
एक दिवस बघता बघता घेतली त्याने उडान,
क्या स्वतःचे दानापाणी यही है आसमान...?
एक वकत आकाशाकडे बघून स्वतःलाच बजावलं त्याने
“नही नही अभी बहोत उंचा उडना है”
पंख फडफडत,जी-जान लावून पुन्हा एक कोशिश,
थोड्या वेगळ्या उंचीवरून,त्याने पाहिली दुनिया..
चार-दोन पुरस्कार,पाच-सहा मानसन्मान
यही तो है ना आसमान...?
“नाही,अजून थोडसं वर गेलो कि आलंच”
समजावलं त्याने स्वत;ला
पुन्हा एक जोरदार प्रयत्न...अन् तो पोहोचला,
त्याच्या अग्निपंखाच्या जोरावर
त्या उंचीवर,
जिथे पोहोचतात फारच कमी लोकं....!
खाली असलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यात आता तो विणत होता,
त्याच स्वप्नाचं जाळं,
जे कधी पाहिलं होत त्याने...आसमान कवेत घेण्याचं
हे करता करता जेव्हा त्याने अखेरचे डोळे मिटले ,
तेव्हा त्याच्या नजरेतल्या स्वप्नांनी हा जहाँ रोशन झाला होता...
कधी काळी आकाशाला कवटाळू बघणारा माणूस,
आज स्वत:च एक नया आसमान झाला होता..!
No comments:
Post a Comment