Friday, 12 August 2016

मोहेंजोदरो

बऱ्याच काळाच्या प्रतिक्षेनंतर ‘ द आशुतोष गोवारीकरांचा’ बहुचर्चित सिनेमा मोहेंजोदारो आज प्रदर्शित झाला.सिंधू संस्कृतीच्या खोऱ्यात वसलेल्या या प्राचीन नगराभोवती फिरणारी एक काल्पनिक तरीही आजच्या आणि यानंतरच्या काळाशी जोडली जाणारी कथा म्हणजे मोहेंजोदारो.कथा सुरु होते इसवी पूर्व २०१६ ला.निळेची शेती करणारा सर्मन (ह्रितिक) आपल्या काका दुर्जन(नितीश भारद्वाज)बरोबर आम्री नावाच्या गावात राहतो.त्याला लहानपणापासून मोहेंजोदरोला जायचं आकर्षण आहे आणि त्यासाठी त्याचा काका त्याला परवानगी देत नाही.बऱ्याच प्रयत्नांनंतर नीळ विकायला दुर्जन त्याला जायची परवानगी देतो.मोहेंजोदारो मध्ये आल्यानंतर तिथला व्यापार,शेतकऱ्यांच होणार शोषण बघून सर्मन अस्वस्थ होतो आणि राज्याच्या प्रधान असलेल्या महमने(कबीर बेदी) वाढवलेल्या कराच्या निषेधार्थ आवाज उठवतो.महम क्रूर आहे,कपटी आहे,निरंकुश राजसत्तेला शोभणारे(?) सगळे गुण त्याच्यात आहेत.‘पिला धातू’ च्या शोधासाठी त्याने इतरांचा विचार न करता सिंधूवर एक प्रचंड बांध घातला आहे आणि त्याचे दुष्परिणाम मोहेंजोवासियांना भोगावे लागत आहेत.यानंतरचा चित्रपट काहीसा टिपिकल बॉलीपिक आहे.चानी (पुजा हेगडे)चे सर्मनला भेटणे त्यांच एकमेकांच्या प्रेमात पडणे आणि त्यांच्या लग्नाला येणाऱ्या अडचणी याच्या backdropवर सर्मन सत्तेला आव्हान देतो.त्यातच त्याला त्याची ‘सच्चाई’ कळते आणि मग प्रतिशोधाचा रंग गहिरा होत जातो.शेवटी लोकं पेटून उठतात आणि अन्यायी महमला सत्तेवरून दुर करतात,नवीन प्रधान म्हणून सर्मनला नेमू बघतात पण आता लोकांचं राज्य आणू म्हणून तो ते नाकारतो.खरतर इथे चित्रपट संपवणे दिग्दर्शकाला शक्य होते पण गोवारीकरांमधला accomplish दिग्दर्शक इथे कमाल करतो. सोन्याच्या लालसेपायी सिंधुवर बांधलेलं धरण फुटते आणि त्यातून सगळ्यांचा जीव सर्मन वाचवतो.तो वाचवताना VFX चा खुप प्रभावी वापर केलाय,उधाणलेली सिंधूसुद्धा खुप प्रभावीपणे दाखवली आहे.शेवटी नगर बुडते आणि एक नवीन नगराची लोकं सुरुवात करतात.
        Cinematography उत्तम,effects वाखाणण्याजोगे आणि कला दिग्दर्शन भव्य(टिपिकल गोवारीकर), संगीत अर्थातच सुंदर (रेहमानच्या संगीताचे समीक्षण नसते करायचे महाराजा..जीवाचे कान करून ते फक्त अनुभवायचे)कलाकारांचे अभिनय चांगले.ह्रितिकने साकारलेला नायक मनात घर करून ठेवणार,पुजा हेगडे तितकीशी प्रभावी वाटत नाही.कबीर बेदीचा खलनायक आणि अरुणोदय सिंगचा ‘मुंजा’ जमून गेलेत.नितीश भारद्वाज बऱ्याच दिवसांनी मोठ्या पडद्यावर दिसलेत,त्यांच दर्शन सुखावह वाटत..आणि अनेकदा ‘कृष्ण’ आठवायला भाग पाडत.किशोरी शहाणे,सुहासिनी मुळे,शरद केळकर यांनीही चांगल काम केलंय.
       सिंधू संस्कृतीच्या बारीक खुणा टिपून त्यांच केलेलं चित्रण भावणारे.एका बाजूला या चित्रपटात ‘आहे रे विरुद्ध नाही रे’ संघर्ष आहे,आम्हांला नायक का लागतात याचा वेध घेतलाय आणि त्याचवेळी क्षणिक हव्यासापोटी प्रकृतीवर ताण देऊ नका,तो ताण असह्य झाला कि ती तुम्हांला उध्वस्त करेल असा पर्यावरणीय संदेशही मिळतो.एका काल्पनिक कथेला जोडणारे अनेक वास्तववादी पदर अनुभवायचे असतील तर मोहेंजोदारो (चित्रपटगृहात जाऊन) बघायलाच हवा.

No comments:

Post a Comment