Monday, 28 December 2015

सीतारामाची भलावण

प.बंगालमध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची परीषद कोलकाताला पार पडली.गेला बराच काळ सत्तेत असल्याने अशा परीषदेची गरज पूर्वी कम्युनिस्टांना वाटली नव्हती.बंगालमध्ये डाव्याची एकाअर्थी monopoly,त्यांच्या त्या अवकाशाला धक्का लावला तो ममतांनी 2011 मध्ये.यानंतर बंगाल मध्ये तृणमुल विरुद्ध डावे असे सामने खेळले जातील असा अंदाज बांधला जात असताना भाजपाने केंद्रात सत्ता मिळवली आणि बंगालमध्ये आपली ताकद वाढवण्याकडे 'शतप्रतिशत' कल दाखवला आणि सामना तिरंगी झाला.
          काल झालेल्या परीषदेत सीताराम येचुरींनी तेच गाण (की रडगाण) पुन्हा गायल.वर्गसंघर्ष,कम्युनिलीझम-सेक्युलिरीझमच टेबलटेनिस खेळल.आणि वृंदा करात यांनी केंद्रातुन 'भाजप हटाव,देश बचाव'च्या घोषणा दिल्या.(म्हणजे नक्की काय करायच हे मला अजुनही समजल नाही) हि परीषद बंगाल निवडणुकीचा शंखनाद होता...सीताराम येचुरी यांनी आपल्या जराजीर्ण झालेल्या पक्षसंघटनेत प्राण फुंकायचा प्रयत्न केला खरा,पण तो पुन्हा तितकाच ठोकळेबाज आणि पोथीनिष्ठ होता.भारतीय समाजमनाशी CPIची नाळ तुटली ती याच कारणामुळे,पक्षाच्या संघटनेत आणि ढांच्यात काडीचाही बदल न करता त्याच्या ताकदीवर यश मिळवण म्हणूनच केवळ सीतारामाची भलावण ठरते.

No comments:

Post a Comment