प्रिय आमिर
तुला काही लिहाव (आणि बोलाव) अस काहीच आता उरल नाही.गेल्या दोन दिवसात तुझ्या अतिअसहिष्णु टिप्पणी वरचा असहिष्णु हंगामा अखेर आज संपला(लोक अचानक आज patriotic moodमध्ये shift झालेत) कुठेही trolls नाहीत,बातम्या नाहीत,forwarded जोक्स नाहीत सगळ कस शांत शांत (पक्षी:सहिष्णु सहिष्णु)....
खरतर चुक तुझी नाहीच मुळी,असलीच तर आमची आहे...चित्रपटात तु उभा करत असलेला नायक, मंगल पांडे पासून डीजे पर्यंत आणि ACP राठोड पासून ते भुवन पर्यंतचा 'तु' आम्ही खरा मानत आलो.पडद्यावर दिसणारा नायक हा त्याच्या आयुष्यातही तितकाच sensible असतो हा भेद आम्ही विसरतो आणि स्वत:ला त्रास करून घेतला.सलमानच्या शिक्षेवेळी पण आम्ही हेच केल होत आठवतय ना?
CSR activity म्हणून तुम्ही केलेली समाजसेवा ही तुमची आणखी एक प्रतिमा,तीच वास्तव फक्त प्रसिद्धी पुरतच असत हेही आम्ही विसरतो ही आमची दूसरी चुक.
आता 'ते' वाक्य तु बोललाच नव्हतास,किरण राव बोलली होती (त्यात ती हिंदू)म्हणून तुला तांत्रिक अटींवर निर्दोष ठरवण्याचा डावखुरा बावळटपणा मी करणार नाही तसच तुझ्या चित्रपटावर बहिष्कार घाला वैगेरे उपद्यापही मला पटत नाहीत (एक कलाकार म्हणून तुझ कौशल्य वादातीत आहे ,मग मी एक चांगला चित्रपट का सोडू? )
तु काय,शाहरुख काय,कमाल खान काय किंवा विजय तेंडुलकर,यु.आर.अनंतमुर्ति काय कलाकाराने 'फ्रेम' सोडली की उरणाऱ्या व्यक्तीला किती गंभीरपणे घ्यायच हे आम्हाला आता ठरवाव लागेल..
तुझाच
एक सहिष्णु भारतीय चाहता
Thursday, 26 November 2015
प्रिय आमिर
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment