मा.संमेलनाध्यक्ष
८९ व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आपले अभिनंदन करावे की 'देशाचा प्रथम नागरिक कोण?' हे माहिती नसलेला अध्यक्ष संमेलनाला मिळाला याच खेद बाळगावा या संभ्रमात मी आहे.आपला अभ्यास मोठा,समीक्षक,कवी,नाटककार म्हणून आपली कारकीर्द मोठी म्हणूनच या साऱ्या पार्श्वभूमी आपले विधान निंदास्पद ठरते.गोध्रा दंगल घडून आता एक तप उलटून गेले,त्यानंतरच्या चौकशीच्या फेऱ्यातुन नरेंद्र मोदी निर्दोष सुटले,इतकच नाही तर विधानसभेत आणि नंतर लोकसभेतही त्यांना बहुमत मिळाल त्यामुळे हा मुद्दा निकाली निघतो.बर कुणी गोध्राचा विषय काढला तर भाजपा समर्थक १९८४ च्या शिख दंगलीकडे बोट दाखवतात,अजुन काही लोक ते बोट गांधी हत्येनंतरच्या दंगलीपर्यंत मागे नेतात,त्या वादात आता फारस तथ्य राहील नाही त्याचा उगीच वितंड होत राहील.
मा.पंतप्रधानांचा उल्लेख आपण एकेरीने केलात.त्यातला प्रेमाचा उमाळा आम्ही समजू शकतो.पण घटनात्मक दृष्टया इतक्या उच्चपदस्थ व्यक्तीला एकेरी संबोधने अयोग्य आणि अप्रस्तुत.निदान आपण जितक्या मताधिक्याने संमेलनाध्यक्ष झालात त्याच्या दुपटीपेक्षा जास्त जागा घेऊन मोदी पंतप्रधान झालेत हे भान तरी (चारचौघात) असायला हवे होते.
आपण भारत-पाक संबंधाचे जाणकार म्हणून ओळखले जात नाहीत,त्यामुळे ती चर्चादेखील अर्थशून्य ठरते. तळहातावर जीव,शोकसभा हे आपल्या सैल जीभेने तोडलेले तारे असतील केवळ शाब्दिक बुडबुडे ठरतात.
साहित्यिकाचा पिंड राजकारण्याचा नसतोच,त्यामुळे त्यांनी राजकारण करू नये.याउलट राजकीय नेत्यांनी साहित्यिक गुणधर्म शिकायला हवेत,राज्यकर्त्याला ते सर्जनशील बनवतात.साहित्य संमेलनाच्या मंडपात तरी राजकीय चपला घालून कुणी जाऊ नये.त्याच पावित्र्य अबाधित राहायला हव.
Saturday, 2 January 2016
मा.संमेलनाध्यक्ष
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment